| Abstract: | भारताने ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लड, ऑस्ट्रोलिया या देशाकडून संसदीय लोकशाहीचा स्विकार केला आहे. लोकशाहीत लोकांनी प्रत्यक्ष मतदानद्वारे निवडून दिलेले प्रतिनिधी मार्फत राज्य चालविले जाते म्हणजेच लोकशाहीत जनताच अप्रत्यक्ष राज्यकर्ती असते. लोकशाहीतील जनतेचे महत्व, सत्ताधारी राजकारणी, विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या नेत्याची बदलती भूमिका, नेत्याची स्वार्थासाठी बदलत चाललेली पक्ष निष्ठा, मतदान करणाऱ्या जनतेची होणारी कुचंबना, मतदानासाठी जनतेत वाढत चाललेला निरूत्साही तथा निष्काळजीपणा, निवडून येणारे नेत्याचे मतदार संघाकडे होणारे दुर्लक्ष, शासनाच्या योजना गरीब तळागळातील जनतेपर्यंत न पोहचणे, नविन नावाने जुन्याचा होत असलेला वापर, विरोधी पक्षामध्ये सक्षम नेतृत्वाची कमतरता, स्वार्थासाठी नेत्यात होणारे बदल व त्यामुळे जनतेवर होणारे विपरीत परिणाम हे भारतीय राजकारणावर परिणाम करत आहे. विकसीत भारत देश म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतांना घटक राज्यात घडवून आणत असलेले सत्त्तातर हा एक रोग वाढत चाललेला दिसून येतो. लोकशाहीच्या राजकारणात वाढता प्रांतवाद, भाषावाद, नेत्यांची बदती निष्ठा हे राष्ट्र विकसीत करण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल करणारे होत आहे. |